येत्या २४ तासात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई :
दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होणार असून 15, 16 आणि 17 तारखेला कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक यांनी दिली आहे.तसेच कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ते 17 मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
आयएमडीने रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडेल. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या काळात येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
दरम्यान, चक्रीवादळ तोक्ते मध्ये १२ तासात बदल होतील. त्यानंतर यामध्ये तिव्रता पाहायला मिळेल. सुरुवातीला हे चक्रीवादळ पुढे जाण्याची बरीच शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत उत्तर-पूर्वेकडे जाईल.दरम्यान
शनिवार ते सोमवार राज्यात पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके, शेडमध्ये अथवा, झाकून ठेवावीत .