कोल्हापूर :

नागरीकांच्या जन्माच्या नोंदणीला पंधरा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला परंतु नाव नोंदविले नाही, अशा सर्व नागरिकांनी दिनांक 27 एप्रिल 2026 पर्यंत नाव नोंदणी करुन घ्यावी. यापूर्वी ही मुदत दि. 14 मे 2020 पर्यंत होती. तथापि ही मुदत आणखीन पाच वर्षानी वाढविण्यात आली असल्याने नागरिकांना 27 एप्रिल 2026 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र (दहावी, बारावी), पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड यापैकी दोन पुराव्यासहक दिनांक 26 एप्रिल 2026 पर्यंत जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करता येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ. यु. जी. कुंभार यांनी दिली. …

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!