जिल्ह्यात : ७३ गावात वनस्पतीच्या ६१ प्रकारच्या मुळ वाणांचा खजिना
कोल्हापूर :
येथील निसर्ग मित्र संस्थेतर्फे २०२० व २१ या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष २०२० व स्थानिक फळे व भाजीपाला संवर्धन वर्ष २०२१ या वर्षांनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील वनस्पती च्या नावाने परिचित सुमारे ७३ गावांना भेटी देण्यात आल्या. या भेटी दरम्यान अनेक फळे, पालेभाज्या, वनौषधी, कडधान्य, स्थानिक पिके इत्यादी वनस्पतीतील सुमारे ६१ मूळ वाणांचा खजिना स्थानिक नागरिकांकडून जतन केल्याचे आढळले आहे.

यातून सर्वच वानांचा भविष्यकाळात लोकसहभागातून जतन करून संवर्धन करण्याचा संस्थेचा मानस आहे.
या भेटीदरम्यान आढळलेले ठळक मुद्दे….
अनेक जेष्ठ नागरिक व कृतिशील शेतकऱ्यांकडून विविध वाणांचे जतन केलेले आढळले. अनेक वाणांचे महत्व उपयुक्ततेबद्दल माहितीचा अभाव असलेले लक्षात आले.अनेक गावांमध्ये गावचा इतिहासाविषयी फारशी माहिती मिळू शकली नाही.अनेक गावांमध्ये वनस्पती संपदा बऱ्यापैकी टिकून आहे. पण नव्याने स्थानिक वृक्षांना प्राधान्य दिले जात नाही असे दिसून आले.अनेक गावातून परसबागेचे अस्तित्व कमी झालेले दिसून आले.शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे नव्या पिढीचा कल दिसून आला, पण अल्प प्रमाणात प्रयत्न आहेत.स्वच्छता व कचरा व्यवस्थापना विषयी थोडीफार जागृती दिसून आली पण कृतीचा अभाव आहे. आपत्ती व्यवस्थापनाविषयी सखोल माहितीचा अभाव दिसून आला. शालेय शिक्षणाविषयीव्यापक जागृती झालेली दिसून येते पण व्यवस्थापन शिक्षणाचा अभाव दिसून आला. आरोग्याविषयी अल्पशी जागृती दिसून आली.

देवराई संवर्धनाविषयी जागृती आहे. पण निसर्ग निर्मितीपेक्षा भौतिक प्रगतीकडे वाटचाल दिसून येते.
पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन सक्षम करणे गरजेचे आहे असे दिसून येते. तरुण मंडळ, महिला मंडळ त्यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.भविष्यात वनस्पतींच्या नावाने परिचित असणाऱ्या गावात स्थानिक जैवविविधता निर्माण करणे काळाची गरज आहे.
या संपूर्ण मोहिमेमध्ये सर्वश्री दिलीप पेटकर, पराग केमकर, मोहन जाधव, खंडेराव हेरवाडे, विनायक सनगर, अस्मिता चौगुले, नरेंद्र भद्रापुरे, रणजित कालेकर, विजय रानमाळे, अवधूत वीर, शहाजी माळी, आनंदा ठोंबरे, दिनकर मोहिते यांचा सहभाग होता.
दुर्मिळ वनस्पती…..
महाळुंगे, हनुमान फळ, मोह, खडशिंगी, हूंब, पाडळ, पपनस (बम्पर), रक्तचंदन, तीवर, उक्षी, साळवन..
वनौषधी वनस्पती…..
वड, पिंपळ, बेल, कवट, अर्जुन, वेखंड, रिठा, जांभूळ, काटेसावर, पळस, शमी, ऐन, आपटा, शेंद्री, गोंदणी, रुई, कणेरी
फळे….
फणस, आंबा, पेरू, चिबूड, कोकम, आवळा, करांदा, कॉफी, बोर, करवंद, चिंच
पिक वनस्पती…..
वांगी, मका, वरणा, आले, नाचणी, वरी, साळ भात, आजरा घनसाळ, मिरची, बटाटा, रताळे
रानभाजी….
कोहळा, टाकळी, कडवी, राजिगरा, करंबळी शेंग, गोमाटी, वाघाटी
मसाला वनस्पती……
मिरवेल, हळद, त्रिफळा.
गाव आणि फळ…
1.म्हाळुंगे – म्हाळुंग
- तिरपण – तीवर
- साळवण – साळवण, साळीच भात
- वडगाव – वड
- पिंपळगाव – पिंपळ
- बेलेवाडी – बेल
- कवठेपिरान – कवठ
- वेखंडवाडी – वेखंड
- रिंगेवाडी – रिठा (रिंगणी)
- जांभुळवाडी – जांभूळ
- ऐनी – ऐन
- आपटी – आपटा
- शेंद्री – शेंद्री
- रुई – रुई
- कणेरी -कणेरी
- फणसवाडी – फणस
- आंबेवाडी ता. चंदगड – आंबा आंब्याच्या विविध प्रजाती
- चिंचेवाडी – चिंच
- सैनिक टाकळी – टाकळी
- मिरवेल – मिरवेल
- पळसंबे – पळस
- हळदी – हळद
- नेरले – मका
- आल्याची वाडी – आले
- बोरबेट – बांबू बेट
- आजरा – आजरा घनसाळ
- नरसिंह वाडी – वांगी
- उमरवाढ – पेरू
- तुडये- रताळे
- अर्जुनवाढ व अर्जुनी- अर्जुन
- काटेभोगाव- चिबूड
- भुये – हनुमान फळ
- गोरंबे- हुंब
- मौसम – पपनस, खेडसिंगी
- शिरोळ – गोंदणी
- पेठशिवापूर – कॉफी
- जैताळ – मोह