भारत भूमीमध्ये आले चित्ते

Tim Global :

१९५२ मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाला होता. आता पुन्हा एकदा भारताची भूमी चित्यांनी भरली . त्यांचे नवीन निवासस्थान मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय वन उद्यान बनले . नामिबियातील आठ चित्ते आज पहाटे एका विशेष विमानातून ग्वाल्हेरच्या महाराजा विमानतळावर पोहोचले आणि त्यानंतर हे सर्व चित्ते लष्कराच्या तीन विशेष हेलिकॉप्टरने कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११.३० च्या सुमारास लीव्हर खेचून तीन चित्ते उद्यानात सोडले. सर्व चित्ते काही दिवस विशेष बंदोबस्तात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील हवा-पाण्याची आणि वातावरणाची सवय झाल्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल.

चित्त्यांना सोडल्यानंतर पीएम मोदी म्हणाले की, मी नामिबिया सरकारचे आभार मानतो. हे ऐतिहासिक क्षण आहेत की आज चिते भारताच्या भूमीत परतले आहेत. ते म्हणाले की, भूतकाळ आपल्याला उज्ज्वल भविष्याची संधी देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लीव्हर खेचून चित्त्यांना उद्यानात सोडले. लीव्हर खेचून त्यांनी आठपैकी फक्त तीनच चित्ता उद्यानात सोडले. कुनो नॅशनल पार्कचे प्रशासन उर्वरित पाच चित्ता सोडणार आहे. चित्ता सोडल्यानंतर पीएम मोदी फोटोग्राफी करतानाही दिसले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!