धन्य धन्य ती माता : आईने दिले काळजाच्या तुकड्यासाठी काळीज
कोल्हापूर :
शेतकरी कुटुंब,आणि
बारावीत शिकणारा एकुलता एक मुलगा,आता करियर ची सुरवात होणार आणि काम कामधंदा करून घरचा गाडा मी चालविणार,आई बाबाचा भार हलका करणार,अशी आशा बाळगून शिक्षण घेत असताना,अचानक नीतीच्या मनात काय वेगळे आले,आणि पंधरा दिवसापूर्वी या विद्यार्थ्याच्या तब्येतीत बिघाड झाला, त्याचे डोळे व शरीर पिवळे दिसू लागले.आणि घरच्या कुटुंबाच धावपळ उडाली.
करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील ती घटना आहे. अश्विन पांडुरंग पाटील असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पुढे घरच्यानी अश्विन ला उपचारासाठी
कोल्हापुरात दाखल केले, नंतर डेंग्यू कावीळ झाल्याचे निदान झाले.
हसता बोलता एकुलता एक १६ वर्षाचा तरुण मुलगा.त्यास कावीळीची लागण होते, आणि उपचार सुरू असताना अचानक त्याला अशक्त वाटू लागते, त्याचे यकृत निकामी झाल्याचा डॉक्टरांचा रिपोर्ट येतो, आणि एक हसते खेळते कुटुंब दुःखात बुडून जाते.उपचार नंतर एक दिवस घरी थांबल्यानंतर अश्विन ला चक्कर आली. सर्व कुटुंब घाबरले.त्याला पुन्हा दवाखान्यात दाखल करण्यात आले.
सोनोग्राफी करण्यात आली, आणि यात त्याचे यकृत निकामी झाल्याचा अहवाल आला.आणि सगळे कुटुंब व नातेवाईकांच्या पायाखालची वाळू घसरली, आणि तो मृत्यूशी झुंज देऊ लागला . पण आता यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय उपाय नाही असा डॉक्टरांनी सल्ला दिला.
उपचार साठी एकतर पुणे अथवा मुंबईला घेऊन जावे लागेल,असे सांगण्यात आले.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने यासाठी ३० ते ४० लाखाचा खर्च येणार असल्याने बाका प्रसंग निर्माण झाला.मुलग्यासाठी अश्विनची आई अस्मिता आपल्या मुलाला यकृत देण्यासाठी एका पायावर तयार झाली.आणि पुढे शस्त्रक्रियेसाठी हालचाली सूरु झाल्या.
बुधवारी पुण्यात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आईचे यकृत काढून कुणालवर यशस्वी यकृत प्रत्यार्पण करण्याची,तब्बल १२ तास शस्त्रक्रिया करण्यात आली,आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली, आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आपले काळजीच आईने दिले, आणि आपल्या मुलाला पुनर्जन्म दिला आहे.आता या मायलेकांची प्रकृती ठणठणीत आहे. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आपले काळीज देणारी ती माता धन्यच म्हणावी लागेल. वडिलांनी ही कोणताही विचार करता नातेवाईकांच्या व मिञपरिवाराच्या सहकार्याने पुण्यात अँडमिट केले पण आता या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.
गावकरी मदतीला धावले — अश्विन पाटील,आणि वडील हे गावकरी ग्रुपमधून सामाजिक कार्यक्रमात पुढे असतात. त्यांच्या वरील असा प्रसंग पाहून वरणगे पाडळी गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळे मदतीसाठी पुढे येत आहेत, पण आता ४० लाखाचा खर्च येणार असल्याने राजकीय सामाजिक दानशूर व्यक्तीनी मदतीचा हात देण्याची गरज आहे. यासाठी वडिलांचा फोन नंबर असा आहे
+919822164820..