मुंबई :

करोना मुळे राज्यातील शाळा पूर्णपणे बंद होत्या, यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरु आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकीकडे करोनाचं प्रमाण काहीसं नियंत्रणात येत असल्याचं दिसत असल्यामुळे राज्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय येत्या आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तशी माहिती दिली आहे. १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्यासंदर्भात कमिटीने सर्व एसओपी निश्चित केल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल”, असं मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

करोना रुग्णसंख्या मर्यादित असलेल्या ग्रामीण भागातच शाळा सुरू आहेत,आता शहरी भागातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यांनी दिली आहे.

राज्यात करोना संदर्भातील निर्बंध लागू आहेत. करोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार करोनाचे निर्बंध देखील काही ठिकाणी शिथिल तर काही ठिकाणी कठोर अशा स्वरूपाचे आहेत. करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या राज्याच्या ग्रामीण भागात आधीच शाळा सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. त्यासाठी करोनाची रुग्णसंख्या आणि इतर अटी घालून दिल्या असून आता जादा वर्गांचा समावेश देखील केला जाणार आहे.

येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. रुग्णसंख्या कमी झाली , अशा ठिकाणी ग्रामीण भागात ५ वी ते ८ वीच्या शाळा देखील सुरू करण्याचा विचार आहे. शहरी भागात महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील ८वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल असं मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!